आपला सुवर्णकाळ असताना यश,समृध्दी,लक्ष्मी यांची कृपादृष्टी आपल्यावर असते थोडक्यात आपल्या सुखाच्या दिवसात आपली अखंड बडबड ऐकायला सगळेच असतात.
" काय बरोबर बोललास राव अगदी बरोबर ' हे सुरात सूर असतात.
आपल्या कडून झालेली मदत ते चारचौघात कधीच सांगणार नाही.आपले आणि त्यांचे नाते खूप जवळचे असते.
पण.....
काही कारणाने काही काळासाठी आपण अडचणीत येतो त्यावेळच्या संकटकाळात आपले मनातील दुःखाचे दोन शब्द ऐकताना "तुझे काय घेऊन बसलाय आमचे मागे टेन्शन काय कमी आहेत का? माणसाने कसे खंबीर असावे." असे बोलणे ऐकावे लागते आणि वर
त्यांनी आपल्याला केलेली छोटीशी मदतहि उपकार म्हणून चारचौघात जाहीरपणे सांगतात.आपले आणि त्यांचे नाते तसे जरा दुरचेच असते.
आपला चांगला काळ परत येताच यांना आपले नाते किती जवळचे आहे हे परत आठवते.